Nanded News : भूविकास बँकेच्या कर्जातून शेतकऱ्यांची मुक्तता; ५१०६ शेतकऱ्यांना मिळाला लाभ

नांदेड जिल्हा सहकारी कृषी, ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेचे (भूविकास बँक) जिल्ह्यातील पाच हजार १०६ शेतकऱ्यांसह २३ सेवा सहकारी संस्थांकडे शंभर कोटींच्यावर कर्ज थकले होते.
loan
loansakal

नांदेड - जिल्हा सहकारी कृषी, ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेचे (भूविकास बँक) जिल्ह्यातील पाच हजार १०६ शेतकऱ्यांसह २३ सेवा सहकारी संस्थांकडे शंभर कोटींच्यावर कर्ज थकले होते. हे कर्ज राज्य शासनाने माफ केले आहे. यामुळे जिल्ह्यातील शंभर कोटींची कर्जमुक्ती मिळाल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली.

भूविकास बँक अवसायनात निघाल्यानंतर कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नव्हती. परिणामी सातबाऱ्यावर बोजा कायम राहिला. यामुळे नवीन पीककर्ज घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. राज्य शासनाने नुकताच कर्जमाफीचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील पाच हजार १०६ कर्जधारकांचे ९७ कोटी ३५ लाख आठ हजार ७८६ रुपयांचे कर्ज माफ होऊन सातबारा कोरा झाला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या भूविकास बँकेत पाच हजार १०६ खातेधारकांची संख्या आहे. १९३५ पासून सुरू झालेल्या या बँकेचा कारभार १९९७ - १९९८ पर्यंत सुरळीत होता. त्यानंतर शासनाने हमी नाकारली आणि नाबार्डनेही पतपुरवठा करणे बंद केल्याने ही बँक अडचणीत आली.

२०१५ मध्ये बँक अवसायनात निघाली. याचा फटका शेतकऱ्यांसह बँकेतील कर्मचाऱ्यांनाही बसला. कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली. शेतकऱ्यांना कर्जमाफीची आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबदल्याची प्रतीक्षा होती.

अखेर राज्य शासनाने कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील पाच हजार १०६ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विद्युत मोटार, पाईप लाईन, ट्रॅक्टर, मळणी यंत्र, दुधाळ जनावरे, शेळी पालन, गाय गोठा आदींसाठी कर्ज वाटप करण्यात आले होते. तसेच २३ सेवा सहकारी संस्थांना गोडावून बांधकामासाठी कर्ज वाटप करण्यात आले होते.

परंतु कर्ज थकल्यामुळे शासनाने ता. नऊ नोव्हेबर २०२२ रोजीच्या शासन आदेशानुसार कर्ज माफ केले आहे. यात पाच हजार १०६ शेतकऱ्यांकडील ६७ कोटी ३५ लाख आठ हजार ७८६ रुपये तर सेवा सहकारी सोसायट्यांकडील दोन कोटी ७० लाख १६ हजार ६१७ असे एकूण शंभर कोटी पाच लाख २५ हजार ४०३ रुपयांचे कर्ज माफ केले आहे. यामुळे जिल्ह्यातील थकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सात - बारावरील बोजा काढून टाकावा

जिल्ह्यातील भुविकास बँकेचे कर्ज घेणाऱ्या पाच हजार १०६ शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा टाकण्यात आला होता. परंतु आता कर्ज माफ झाल्यानंतर संबधीत शेतकऱ्यांनी सातबारावरील कर्ज बोजा कायम आहे. याबाबत भूविकास बँकेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ता. २१ मार्च रोजी पत्र पाठविले आहे. यानुसार शेतकऱ्यांचा बोजा काढून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com