Nanded Farmers : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे; आठवडाभरापासून पावसाची उघडीप, खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या

Nanded News : नांदेड जिल्ह्यात पावसाच्या कमतरतेमुळे खरिपाच्या पेरण्यांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या स्थितीमुळे फक्त १५ ते १६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकरी आभाळाकडे डोळे लागून बसले आहेत.
Nanded Farmers
Nanded Farmerssakal
Updated on

नांदेड : गेल्या आठवडाभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत काही भागांत जोरदार पाऊस झाला असला, तरी मागील सात दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या स्थितीमुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १५ ते १६ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com