

Nanded
esakal
नांदेड: शहराच्या जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांना यश येऊ लागले असून शहरातील २२ प्रमुख नाल्यांमधून थेट नदीत मिसळणारे सांडपाणी पूर्णपणे रोखण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे. अमृत २.० योजना आणि राज्य नदी संवर्धन अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या मलनिःस्सारण व मलशुद्धीकरण यंत्रणेमुळे आता सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरच ते नदीत सोडले जात आहे.