नांदेड विभागातील रेल्वे अपघाताची उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत

बदनापूर ते करमाड रेल्वे अपघात.jpg
बदनापूर ते करमाड रेल्वे अपघात.jpg

नांदेड विभागात घडलेल्या रेल्वे अपघाताची उच्चस्तरीय चौकशी

नांदेड : मनमाडकडे जात असलेल्या मालगाडीनें शुक्रवारी (ता. आठ) सकाळी ५.२२ वाजता घडलेल्या दुदैवी घटनेत रेल्वे पटरीवर झोपलेल्या मध्यप्रदेशातील मजूरांना धडक दिली. यात १६ जनांचा मृत्यू झाला. ही घटना नांदेड रेल्वे विभागातील बदनापूर ते करमाड रेल्वे स्थानकादरम्यान परभणी ते मनमाड सेक्शनमध्ये घडली. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा आयुक्त, दक्षिण मध्य सर्कल यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय चौकशी समितीचे गठन करण्यात आल्याची माहिती नांदेड विभागीय रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.

अपघातात १६ जनांचा मृत्यू
या घटनेत १९ जणांच्या समुहामधील १४ जण घटनास्थळीच मृत्युमुखी पडले तर दोन जण गंभीररीत्या जखमी झाल्यामुळे नंतर मृत्युमुखी पडले. यातीलच एका जणाला जखमी अवस्थेत औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. रेल्वे चालकाने रेल्वे पटरीवर काही लोक असल्याचे लक्षात येताच गाडीचा हॉर्न जोरात वाजवला तसेच गाडी थांबवण्याचे पूर्ण प्रयत्न करूनही ही घटना घडली.

डीआरएम उपिंदर सिंग लक्ष ठेवून 
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे  (आर.पी.एफ.) अधिकारी तसेच रेल्वेच्या इतर विभागातील अधिकारी घटनास्थळी धावले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग हे रेल्वे विभाग करत असलेल्या बचाव कार्याची व्यक्तिशः पाहणी करण्याकरिता घटनास्थळी पोहोचले. रेल्वे डॉक्टर, नर्सेस आणि इतर वैद्यकीय चमू आवश्यक त्या वैद्यकीय साधन आणि उपकरणासहित मेडिकल रिलीफ व्हॅन (एमआरवी) ने वैद्यकीय मदती करिता घटनास्थळी पोहोचले. दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी घटनेची माहिती मिळताच दक्षिण मध्य रेल्वेच्या मुख्यालयात विविध विभाग प्रमुखांसोबत तातडीची बैठक घेतली आणि आवश्यक ते बचाव कार्य तसेच मदत कार्य लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश दिले.

दक्षिण मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त करणार चौकशी 
या रेल्वे दुर्घटनेची चौकशी करण्याकरिता आणि घटनेचे कारण शोधण्याकरिता रेल्वे सुरक्षा आयुक्त, दक्षिण मध्य सर्कल यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय चौकशी समितीचे गठन करण्यात आली आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल हे येथील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच दक्षिण मध्य रेल्वे प्रशासन त्यांना घटनाक्रमाची माहिती देत असल्याचे नांदेड विभागीय रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.

राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत
नांदेड विभागीय रेल्वे कार्यायलयाच्या हद्दीत घडलेल्या अपघाताचे वृत्त समजताच देशात एकच खळबळ उडाली. राज्य शासनाने या घटनेची दखल घेवून मृत मजूरांच्या कुटूंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. यासोबतच मध्य प्रदेश सरकारकडूनही मदत मिळणार असल्याची माहिती मिळाली. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या घटनेची दखल घेतल्याची माहिती मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com