शेतकऱ्यांना आर्थिक मदत करुन जनावरांसाठी छावण्या उभाराव्यात- बालाजी चुकलवाड 

file photo
file photo

फुलवळ ( जिल्हा नांदेड ) : कंधार तालुक्यातील पानशेवडी व तळ्याचीवाडी परिसरातील ढाकु तांडा, खेमा तांडा, रामा तांडा यासह जवळपास सात ते आठ तांडा परिसरातील दोन हजार ५०० हेक्टरच्या जवळपास जळुन खाक झाली आहे. या आगीत शेतकऱ्यांचे प्रचंड 25 हजार कडबा जळुन खाक झाला आहे. या आगीत पशु प्राण्याचाही मृत्यू झाला आहे.

तसेच काही भागात शेतकऱ्यांचे अवजारे ही जळुन खाक झाले आहेत. नायब तहसिलदार विजय चव्हाण यांनी आपले कर्तव्य बजावत स्वतः गावकऱ्याच्या मदतीने आग विजवण्यात यश आले. पानशेवडी परिसरातील आग अजुन ही चालुच आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अग्नीशामक दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळाला आहे. तांड्यावरील लोकांनी सतर्क राहण्याचे आदेश नायब तहसिलदार विजय चव्हाण यांनी दिले आहेत. 

तर शेतकऱ्यांनी जनावरांसाठी ठेवलेला कडबा पुर्णपणे जळून गेला असल्याने शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करुन त्वरीत आर्थिक मदत देऊन जनावरासाठी छावण्या उभारण्याची मागणी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी निवेदनाद्वारे कंधार तहसीलदार साहेबांकडे केली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com