Nanded News: काय सांगावं बाबा, पाण्यासाठी लय हाल व्हायले; पाणी मिळणं मुश्कील झालंय; माहूरच्या पानोळा, पाचुंदा येथे वणवण भटकंती

Residents Forced to Walk Miles for Water: माहूर तालुक्यातील पानोळा आणि पाचुंदा गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई; विहिरी कोरड्या, नळ योजनेचे पाणी वेळेवर नाही. महिलांना मैलोनमैल पायपीट करावी लागते.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

माहूर: काय सांगावं बाबा, पाण्यासाठी लय हाल व्हायले आमचे...सकाळपासून घागर घेऊन हिंडावं लागतं, विहिरीवर गेलं तर तिथं बी पाणी नाही, घरचं कामधंदा सोडून आम्हाला पाण्यासाठीच वणवण भटकंती करावी लागत हाय. लेकराबाळांना पाजायला बी पाणी मिळणं मुश्कील झालंय. सरकारनं आमच्याकडं लक्ष द्यावं, नाहीतर अजून आमचं लय हाल होतील. मायबाप सरकारने काय नाही दिलं तरी चालल, पाणी पाजलं तेवढंच उपकार होईल, अशी पाणीबाणीची व्यथा पाचुंदा येथील एका वृद्ध महिलेने ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com