

Nanded News
esakal
नांदेड: मोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून चार शालेय मुलांचा मृत्यू झाला. त्यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. शहरातील देगलूर नाका परिसरातील इस्लामपुरा भागात गुरुवारी (ता.१६) दुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात शोककळा पसरली. प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.