

Nanded
esakal
कंधार, ता. ६ (बातमीदार): तब्बल वीस वर्षांपासून ओस पडलेली, एकेकाळी नावारूपाला आलेली, शहराच्या मध्यभागी असलेली जिल्हा परिषद शाळा अखेर पुन्हा सुरू झाली आहे. शिक्षकांचे परिश्रम, जिद्द आणि उपक्रमशीलतेमुळे या शाळेत नवसंजीवनी संचारली असून, यंदा आतापर्यंत ४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे एकेकाळी शांत आणि निर्मनुष्य असलेला शाळेचा परिसर आज चिमुकल्यांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजून गेला आहे.