

Nanded News
esakal
नांदेड: नांदेड-किनवट महामार्गालगत हिमायतनगर तालुक्यातील शेवटच्या टोकाला वसलेल्या खैरगाव गट ग्रामपंचायतीअंतर्गत खैरगाव, खैरगाव तांडा, बोधन तांडा आणि लाइन तांडा गावांतील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही मूलभूत गरज असलेले पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.