
नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, परंतु थोड्याफार प्रमाणात अर्धांगवायूसारखी अजूनही ती शिल्लक राहिलेली आहे. मातंग बहुजन लोक अजूनही त्या मनुवादी मानसिकतेत अडकून पडले आहेत. म्हणून ही अर्धांगवायू झालेली मनूवादी मानसिकता समाजाला कधीही गतिमान नेतृत्व देऊन शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. पी. बी. कोलंबीकर यांनी केले.
अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने मनूस्मृती दहनदिनी सिडको नवीन नांदेड येथे घेण्यात आलेल्या डॉ. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी व्याख्यानमालेत समाजास गतिमान नेतृत्वाची गरज या विषयावर बोलताना त्यांनी वरील उद्गार काढले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलताना शिक्षक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. गंगाधर सोनकांबळे यांनी मातंग व बौद्ध यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्ते मारोती चिवळीकर यांनी समाजातील जाणकार राजकारणी मंडळी चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहत नसल्याची खंत व्यक्त केली. यावेळी विचारपीठावर अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या सिडको शहराध्यक्षा अरुणा बाबळे, शंकरराव शिंदे, एन. डी. गवळे, गंगारामजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन बालाजी गवाले यांनी केले. तर बहुजन मजूर कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नामदेव झुंजारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी प्रयागकोलंबीकर, अनिताताई शिंदे, ज्योती वाघमारे, बालाजी बोयवारे, राम बाबळे, आनंदा वाघमारे, गणपत गोमस्कर, एम. एन. गवळे, इरबाजी सूर्यवंशी, मुरलीधर कांबळे, शिवम घोडजकर, कैलास खानजोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.