Nanded : पावसाळा लांबल्याचा फटका...

जिल्ह्यात सहा टँकरने पाणी पुरवठा; २११ गावांत २७० विहिरींचे अधिगृहण
nanded
nandedSakal
Updated on

Nanded - जिल्ह्यात यंदा पावसाळा लांबल्याचा फटका ग्रामीण भागाला बसला आहे. जिल्ह्यातील चार गावे व चार वाड्यांना सहा टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील २११ गावातही टंचाईमुळे २७० विहिरींचे अधिगृहण करण्यात आले आहे.

दरम्यान, दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे काही भागात समाधानकारक स्थिती असून शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली आहे.जिल्ह्यात सलग दोन वर्ष वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवली नाही. यंदा जिल्ह्याला अधिक टंचाई जाणवेल असे वाटत होते. परंतु जूनमध्ये पावसाने पाठ फिरविल्यामुळे काही भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई जाणवू लागली. आजही अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला नाही.

nanded
Nanded Rain Update : पावसाच्या आगमनामुळे काहीसा दिलासा; शेत शिवारात साचले पाणी

परिणामी भूजल पातळी खालावल्याने अनेक विहिरी व कुपनलिकेचे पाणी आटले आहे. यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातील चार गावांसह चार वाड्यांना सहा टँकरव्दारे पिण्याचे पाणी पुरवठा करावा लागत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई निवारण कक्षातून मिळाली

nanded
Nanded : केवळ हलक्या पावसाचा शिडकावा, पेरणीसाठी कर्ज काढून विकत आणलेली बियाणे हे घरात पडून

यासोबत २११ गावात २११ विहीरींचे अधिगृहण करण्यात आले आहे. यात टँकरसाठी सहा टँकर व्यतिरिक्त २६४ विहीरींचे अधिगृहण करण्यात आले आहे. आगामी काळात समाधानकारक पाऊस झाला तर टँकरसह अधिगृहीत विहिरींची संख्या कमी होईल, अशी माहिती महसूल प्रशासनाच्या सूत्राने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.