

Nanded News
esakal
नांदेड: खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रासायनिक खते व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. तथापि, काही खत विक्रेते व केंद्र चालकांकडून युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, कृषी विभागाने तपासणी मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.