

Nanded News
esakal
नांदेड: जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे हळद पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून उत्पादनात सुमारे ३० ते ४० टक्क्यांची घट नोंदवली जात आहे. कापूस व सोयाबीनप्रमाणेच हळद पिकालाही या अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. परिणामी, मोठा खर्च करूनही अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.