
नायगाव : वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने सोमवारी १९ मे रोजी सायंकाळी सर्वत्र दाणादाण उडवली. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली, विजेचे पोल पडले, विजेच्या तारा तुटल्या, जणावरे दगावली, झाडे उन्मळून पडली व काही ठिकाणी फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.