Nanded Water Crisis : धरण उशाला, कोरड घशाला! नागरिकांची पाण्यासाठी उन्हात भटकंती

नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोटतीर्थ पंप हाउस येथील यंत्रणा नादुरुस्त झाल्याने नांदेड शहरावर पाणी टंचाईचे संकट ओढावले आहे.
water crisis
water crisissakal

- पुरुषोत्तम जोशी

नांदेड - नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोटतीर्थ पंप हाउस येथील यंत्रणा नादुरुस्त झाल्याने नांदेड शहरावर पाणी टंचाईचे संकट ओढावले आहे. मात्र याचा नागरिकांना चांगलाच फटका बसत असल्याचे चित्र आहे. गेल्या चार दिवसापांसून शहरात पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी अबालवृद्धांसह महिलांना पाणीटंचाईचा सामना करीत रखरखत्या उन्हात ४२ डिग्रीच्या पेक्षा अधिक तापमानात हंडाभर पाण्यासाठी फिरावे लागत आहे.

सध्या नांदेड शहराचे तापमान ४२ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक असून उन्हाची तीव्रता वाढत असताना शहरातील नागरिकांना आता पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालिका प्रशासनाकडून आधीच शहरवासियांना अनियमित पाणीपुरवठा करण्यात येतो, अशातच पाणीपुरवठा करणारी यंत्रणा नादुरुस्त झाल्याने पाणी टंचाईच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

युद्धपातळीवर काम सुरू

शहरातील नांदेड उत्तरसह नांदेड दक्षिण मधील भागात देखील पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून ते जवळपास पूर्ण झाले आहे.

कोटतीर्थ पंपिंग स्टेशन मधील पाच पैकी तीन पंप दुरुस्त झाले असून त्याच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. ते येत्या २-३ दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर उर्वरित भागात पाणीपुरवठा सुरळीत होईल. तथापी इसापूर धरणातून ३५ एमएलटी पाणी उपलब्ध झाले असून सोमवारी (ता.सहा) सकाळी सात वाजेपासून त्याचा पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. सध्या ५० टक्के पाणी पुरवठा सुरु करण्यात आला असून उर्वरित भागांचा पाणीपुरवठा काम पूर्ण झाल्यानंतर सुरु होईल. आवश्यकता असलेल्या भागात सध्या टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून २५ टँकरचे नियोजन करण्यात आले असून ते उपलब्ध आहेत.

- महेशकुमार डोईफोडे, आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका.

गेल्या चार-पाच दिवसांपासून आमच्या भागात नळाला पाणी आले नाही. नांदेडमध्ये उन्हाच्या झळा वाढत असून बाकीची कामे सोडून हातपंपाचे पाणी आणण्यात वेळ जात आहे. एरव्ही सुध्दा तीन दिवसांआड पाणी पुरवठा केला जातो. तो देखील नियमित केला जावा.

- सुरेखा गुळवे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com