Nanded News: दहा गावांत पाणीटंचाई, अधिग्रहणासाठी प्रस्ताव; ईस्लापूर परिसरातील गावांचा समावेश

Severe Water Shortage in Kinwat Taluka: किनवट तालुक्यातील ईस्लापूर परिसरात दहा गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून विहीर व बोअरवेल अधिग्रहणासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

ईस्लापूर: किनवट तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत असून, तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. ईस्लापूर परिसरातील गोंडेमहागाव, तोटंबा, सावरगाव, मानसिंग नाईक तांडा, इरेगाव, मारलागुंडा आशा १० ग्रामपंचायतींनी विहीर व बोअरवेल अधिग्रहणासाठी किनवट पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com