
नेर्ले (सांगली) - तो मुंबईहून गावाकडे आला, गावात प्रवेश न करता तो थेट स्वतःहुन प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाला आणि १४ दिवस गाव,कुटुंबापासून स्वतःला वेगळे ठेवत संस्थात्मक कॉरंन्टाईन करून घेतलं.कायद्याने पोलिसांनी त्याच्यावर जिल्हा बंदीचा गुन्हा ही दाखल केला. मात्र त्याच्या चेहऱ्यावर आपण गावाकडे आल्याचे समाधान आहे. गावाच्या काळजीने त्याने कोणालाही जवळ येऊन दिले नाही.
नेर्ले ता.वाळवा येथील महेश पाटील हा मुंबई येथे नोकरी निमित्ताने राहतो. मुंबईतील परिस्थिती त्याने डोळ्या देखत अनुभवली. चाकरमाने,वेठबिगारी,कामगार,चालक,हातगाडीवाले यांचे हाल जवळून बघितले आहे. दै.सकाळशी बोलताना त्याने सांगितले की, महामारीच्या काळात मी मुंबईहुन २८ तारखेला घरी न जाता थेट प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं आणि स्वतःला प्रशासनाच्या हवाली केलं.महेश म्हणतो की,माझ्यामुळे समाज,किंवा गावाला त्रास होईल असे मी वागलो नाही. किलोमीटर मी प्रवास करून आलो .जेवण आणल्यावर मी माझ्या पत्नीशी 20 फुटावरून बोलतो.स्वतःची काळजी घेत इतरांची सुद्धा काळजी घेतो. माझ्या 12 व 9 वर्षांच्या मुलांना मी 2 महिने भेटलो नाही, त्यांना बघायची खूप इच्छा होते पण मी त्यांना बघू शकत नाही. अशी त्याची घालमेल सुरु असताना त्याला गहिवरुन आले.लॉक डाऊन असुन ही काही लोक पुणे मुंबई सारख्या शहरातून गावच्या ओढीने गावाकडे चोरी छूपे येत आहेत पण महेश येताच स्वःताच प्रशासना समोर दाखल झाल्याने त्याचे कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.