
कोल्हापूर : कोरोना झाला म्हणजे मत्यूच होतो, असे सरसकट सर्वांनी समजणे योग्य नाही. कोरोनामुळे मृत्यू होतो, हे भय मनातून काढून टाकावे. कोरोना झालेल्या 100 व्यक्तींपैकी 2 ते 3 टक्के व्यक्तींचा मृत्यूचा दर आहे. यात रोग प्रतिकारकशक्ती कमी झालेल्या व्यक्ती, ज्येष्ठांना कोरोना विषाणूचा धोका आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती "सीपीआर'चे नाक, कान, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी दिली.
ते म्हणाले, ""कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून मास्क घेतले जात आहे. ज्या व्यक्ती संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या सान्निध्यात नाहीत. अशांना सरसकट मास्क वापरण्याची गरज नाही, मात्र ज्यांना श्वसनाचे विकार आहेत, ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत, अशांनी मास्क वापरणे गरजेचे आहे, अशी लक्षणे असणाऱ्यांच्या सान्निध्यात येणाऱ्यांना मास्क वापरावा लागणार आहे.
जे डॉक्टर, आरोग्य सेवक, परिचारिका रुग्णांच्या सान्निध्यात येतात. त्यांनीच मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे, मात्र कोरोनाबाबत अशास्त्रीय माहितीच्या आधारे नाहक भीती बाळगू नये. कोरोनाचा विषाणूचा संसर्ग वेगाने होतो. एखादी संसर्गित व्यक्ती इतरांच्या संपर्कात आली तर त्यातूनही या विषाणूचा फैलाव होतो. जास्त लोकांना संसर्ग होऊ नये, यासाठी शासनाने गर्दी टाळावी, असे आवाहन केले आहे.
कोरोनाचे रुग्ण बरे करण्याचे प्रयत्न
देशात कोरोनाची चर्चा सुरू होऊन महिना होत आला. या कालावधीत एकाचा मृत्यू कोरोनामुळे झाला, अशी अधिकृत माहिती दिली आहे. उर्वरित संशयित म्हणून ज्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यातील बरेच रुग्ण बरे होत आहेत. कोरोनावर थेट औषध नसले तरी पूरक औषधोपचारातून रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहेत. त्याला यश येत आहे. त्यामुळे गैरसमज अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही डॉ. लोकरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.