नव्या पाच पोलिस ठाण्यांची प्रतिक्षाच 

Waiting for the new five police stations
Waiting for the new five police stations

कोल्हापूर : जिल्ह्याला किमान पाच पोलिस ठाणी तरी मंजूर करा, असा आग्रह जिल्हा प्रशासनाने धरला आहे. यात शहरातील सुभाषनगर आणि सानेगुरुजी वसाहत अशा दोन पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. कायदा सुव्यवस्थेसह गुन्ह्यांवर वचक ठेवण्यास ही ठाणी उपयुक्त ठरणार आहेत. 

जिल्ह्याची वाढती लोकसंख्येचा विचार करता पोलिसांची संख्या ही अत्यल्प आहेत. गुन्हेगारीचे स्वरुप वाढत असून सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. मोर्चे, आंदोलनाचे प्रमाण वाढत असून त्यावर अंकूश ठेवण्याचे आव्हान पोलिसामोर आहे. संवदेशनशील भागात पोलिस ठाणे असल्यास संभाव्य गुन्हे टाळता येऊ शकतात. पोलिसांचा ताण कमी होऊ शकतो. यासाठी जिल्ह्यासाठी नव्या 11 पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव जिल्हा पोलिस प्रशासनाने 2011 मध्ये पाठविला आहे. अद्याप तो शासन दरबारी प्रलंबित आहे. 

जिल्ह्यात 31 पोलिस ठाणी आहेत. शहरात जुना राजवाडा, शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी अशी चार पोलिस ठाणी आहेत. करवीर तालुक्‍यासाठी करवीर पोलिस ठाणे आहे. शहरातील जवाहरनगर, सुभाषनगर, आर.के.नगर, पाचगाव, सानेगुरुजी, राजोपाध्येनगर, आपटेनगर, जीवबानाना जाधव पार्क अशा भागात वाढत्या लोकसंख्येबरोबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. हे भाग स्थानिक पोलिस ठाण्यापासून दूर आहेत. त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी तातडीने धाव घेता येत नाही. याचा परिणाम किरकोळ स्वरुपातील गुन्हे गंभीर बनतात. कबनूर,बांबवडे, कोवाड (चंदगड) हे भागही स्थानिक ठाण्यापासून दूर आहेत. निवडणूक काळात हे भाग संवेदनशील म्हणून ओळखले जातात. कबनूर, बाबंवडे, कोवाडसह शहरातील सुभाषनगरासह सानेगुरूजी वसाहत अशा पाच ठिकाणी तरी लवकर नव्या पोलिस ठाण्याला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. हे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पटवून दिले. पाटील यांच्याकडे पालकमंत्र्याबरोबर गृहराज्यमंत्री पद असल्याने लवकरच किमान पाच पोलिस ठाण्यांना अग्रक्रमाने मंजूर होण्याच्या आशा आहेत. 

दृष्टीक्षेपात.. 
*जिल्ह्यातील पोलिस ठाणी ः 31 
*जिल्ह्याची लोकसंख्या ः 38 लाख 76 हजार 
*सब पोलिस स्टेशन ः 6 
*सायबर पोलिस ठाणे ः 1 
*पोलिस कर्मचारी - 2749 
* पोलिस अधिकारी ः 274 
* आणखी 11 ठाण्यांची मागणी 

येथे पाच ठाण्यांची अग्रक्रमाने मागणी 
*सुभाषनगर *सानेगुरूजी वसाहत *कबनूर (इचलकरंजी) 
*बांबवडे (शाहूवाडी) *कोवाड (चंदगड) 
 

जिल्ह्यासाठी 11 नवे पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळावी यासाठी प्रस्ताव यापूर्वीच पाठविला आहे. त्यातील किमान पाच पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळावी, अशी प्रशासनाची आग्रही मागणी आहे. 
- डॉ. अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com