सरकारचा मोठा निर्णय ! सरकारी कार्यालयांमध्ये सोमवारपासून 10 टक्‍के उपस्थिती 

Mantralaya-Mumbai (1) - Copy.jpg
Mantralaya-Mumbai (1) - Copy.jpg
Updated on

सोलापूर : लॉकडाउन वाढण्यापूर्वी राज्य सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये पाच टक्‍के कर्मचारी उपस्थित राहतील, असे सरकारने स्पष्ट केले. मात्र, लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आता सर्व शासकीय कार्यालयांमध्ये रोटेशन पध्दतीने 10 टक्‍के कर्मचारी उपस्थित राहतील, असा निर्णय शनिवारी (ता. 18) राज्य सरकारने घेतला असून त्याची अंमलबजावणी सोमवारपासून (ता. 20) केली जाणार आहे. 


कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात 22 मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. मात्र, आता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज लक्षात घेऊन सरकारने सरकारी कार्यालयात 10 टक्‍के कर्मचारी रोटेशन पध्दतीने उपस्थित राहतील, असे सरकारने स्पष्ट केले. मंत्रालय स्तरावरील सहसचिव व उपसचिवांना कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक राहणार आहे. मात्र, महिला अधिकाऱ्यांना सवलत देण्याचा निर्णय संबंधित कार्यालय प्रमुख तथा सचिवांनी घ्यावा, असेही सरकारने आदेशात नमूद केले आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मंत्रालयातील उपहारगृह तत्काळ सुरु केले जाणार असून तशा सूचनाही संबंधितांना दिल्या आहेत. 


बसमध्ये सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक 
मंत्रालय तथा बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयातील बहूतांश अधिकारी व कर्मचारी उपनगरीय रेल्वेवर अवलंबून आहेत. मात्र, लॉकडाउनमुळे पूर्णपणे रेल्वेसेवा बंद आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्रालयातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट, नवी मुंबई परिवहन बससेवा आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असल्याने बसमध्ये आसन क्षमतेपेक्षा एकही व्यक्‍ती अधिक नसावा, असे सरकारने स्पष्ट केले आहे. 

अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी लोकल रेल्वेच्या धर्तीवर बससेवा 
मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. बहूतांश कर्मचारी मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेवर अवलंबून आहेत. या बाबींचा विचार करुन सरकारने या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी बससेवेचे वेळापत्रक निश्‍चित केले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सकाळी 7 ते 11 या वेळेत पश्‍चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर या रेल्वे स्थानकाजवळून मंत्रालयापर्यंतच्या सर्व टप्प्यांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना घेऊन यावे. कामावरुन जाताना पुरेशा बस उपलब्ध करुन द्याव्यात आणि दोन बसमधील अंतर (वेळ) कमी असावी, याची दक्षता परिवहन महामंडळाने घ्यावी. जेणेकरुन एकाच बसमध्ये खूप गर्दी हाणोर नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. तर बृहन्मुंबईकरिता बेस्टतर्फे विशेष सेवा सुरु केली जाईल, असेही सरकारने आदेशात नमूद केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com