सोलापूर : कोरोना या विषाणूच्या संक्रमणाची साखळी खंडीत करण्याच्या हेतूने आयोजित जनता कर्फ्यू आणि कलम 144 अंतर्गत लागू केलेल्या जमाव बंदीमुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे शहरातील धुळीचे प्रमाण खूपच कमी झाल्याने शहरातील हवा शुध्द होऊ लागली आहे. शहरातील हवेत दररोज अतिसुक्ष्म धुलिकण 55 पीएम तर सुक्ष्म धुलिकण 65 पीएमपर्यंत आढळतात. मात्र, रविवारी (ता. 23) अतिसुक्ष्म धुलिकणाचे प्रमाण 20 पीएम तर सुक्ष्म धुलिकणाचे प्रमाण 30 पीएमपर्यंत आले होते, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली.
हेही नक्की वाचा : मेगाभरती लांबणीवर ! मुदतवाढीनंतर पाच कंपन्यांची नियुक्ती
प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होणाऱ्या शहरांमध्ये सोलापूर टॉपटेन मध्ये आहे. शहरातील जुन्या इमारतीचे पाडकाम तर नव्य इमारतीच्या बांधकामावेळी निघणाऱ्या मटेरियलकडे महापालिका प्रशासनाकडून कानाडोळा केला जातो. तर शहरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूला धुळीचे साम्राज्य कायम आहे. रस्त्यांवरील दुभाजकांमध्ये वृक्ष लागवड केली, परंतु त्यात मातीचे प्रमाण अधिक असल्याने रस्त्यांवरील धुळीत वाढ झाली आहे. वास्तविक पाहता शहरातील रस्त्यांची कामे सुरु असताना निघणाऱ्या मातीवर नियमित पाणी शिंपणे बंधनकारक आहे. तर इमारत पाडकाम अथवा बांधकामावेळी हिरवी जाळी लावणे आवश्यक आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही नियमाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, असा आरोप प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केला आहे. प्रदूषणात वाढ होत असतानाच आता कोरोना या विषाणूला हद्दपार करण्याच्या हेतूने केलेल्या नियोजनामुळे शहरातील हवा प्रदूषण कमी झाल्याचा दावा श्री. भोसले यांनी केला आहे.
हेही नक्की वाचा : धक्कादायक ! खासगी लॅबला केंद्र सरकारकडून मिळेना परवानगी
ठळक बाबी...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.