सावधान : कर्करोगाच्या रुग्णांमध्ये दरवर्षी होतेय 10 टक्के वाढ 

cander day.jpg
cander day.jpg

सोलापूरः कर्करोग झालेल्या रुग्णांचे प्रमाण दरवर्षी 10 ते 12 टक्‍क्‍यांनी वाढत आहे. या कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी लवकर निदान व उपचारात वाढलेला आधुनिक तंत्राचा वापर यासारख्या बाबी प्रभावी झाल्या आहेत. त्यामुळे या आजारातील मृत्यू दराचा आकडा कमी होण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सोलापुरात कर्करोगावर उपचारासाठी सर्व सोयी असल्याने राज्य व परराज्यातून रुग्ण येथे उपचारासाठी येत आहेत. 
शहरांमध्ये मागील मागील तीन वर्षापासून कर्करोग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून अनेक प्रकारचे निरीक्षणे नोंदवली जात आहेत. सोलापूर परिसरात आढळणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वर्षी दहा टक्‍क्‍यांनी वाढत आहे. पुरुषांमध्ये मुख, घसा, फुफ्फूस आदी अवयवांतील कर्करोगाचे प्रमाण खूप अधिक आहे. तर महिलामध्ये स्तन व गर्भाशयाच्या पिशवीच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. 
कर्करोगाच्या रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढते आहे ती बाब अत्यंत धोकादायक मानली जाते. कर्करोगाच्या संदर्भात सध्या रेडिएशन, किमोथेरपी व शस्त्रक्रिया या प्रकारच्या उपचाराच्या पद्धती वापरली जात आहेत. विशेष म्हणजे सोलापूर शहरात कर्करोगावर उपचार करण्यासाठी चांगल्या प्रमाणात सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे सोलापूरसह आंध्रप्रदेश व कर्नाटक भागातूनही येणाऱ्या रुग्णांना चांगली सेवा मिळते आहे. 
कर्करोगाच्या उपचारात संदर्भात आता गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग झाला आहे. त्यामुळे उपचारांमध्ये अचूकता खूपच अधिक वाढलेली आहे. त्यासोबत रुग्णाच्या वेदना कमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. रेडिएशन थेरपी नेमक्‍या बाधित भागावर रेडीयेशन देता येते. मोठ्या शस्त्रक्रियाऐवजी मायक्रोस्कॉपिक आणि रोबोटिक्‍स शस्त्रक्रियेमुळे केवळ कर्करोगाची गाठ काढणे शक्‍य होत आहे. किमोथेरपीमध्ये देखील कर्करोगग्रस्त झालेल्या पेशीपर्यंत औषधे पोहोचतील,अशा पध्दत उपयुक्त ठरली आहे. या सर्व आधुनिक तंत्रज्ञानाने रुग्णांची उपचाराच्या काळात होणारी वेदना कमी होऊ लागली आहे. 

अशी असावी जीवनशैली 
- शरीर तंदुरुस्त ठेवणे 
- नियमित व्यायाम करणे 
- जंक फूड न खाणे 
- पालेभाज्या व फळांचा आहारात वापर 
- पान, तंबाखू, मद्य, सिगारेट, विडी अशी कोणतीही व्यसने न करणे 

कर्करोगाची लक्षणे 
- तोंडातील जखम बरी न होणे 
- अन्न खाताना व पचनास त्रास होणे 
- गळा, स्तन, काख व कुठेही गाठ होणे 
- अचानक वजन कमी होणे 
- खोकला व दम लागणे 
- खोकल्यातून रक्त पडणे 

काळजी घेणे गरजेचे 
कर्करोगाच्या बाबत आरोग्यदायी जीवनशैली ठेवत असताना रोगाचे तत्काळ निदान होणे गरजेचे आहे. निदान झाल्यानंतर योग्य उपचार केले तर कर्करोग बरा होण्याचे प्रमाण वाढते. 
- डॉ. विपुल दोशी, कन्सलटंट ऑन्कोलॉजिस्ट, सिध्देश्‍वर कॅन्सर हॉस्पिटल, सोलापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com