सोलापूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार सर्व शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. 'आरटीई'अंतर्गत 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी पालकांना अर्ज करण्यासाठी 3 ते 21 मार्च अशी मुदत देण्यात आली आहे.
अर्जासोबत लागणारी कागदपत्रे...
आरटीईनुसार अर्ज करण्यासाठी पात्र असलेल्या पालकांनी अर्जातील संपूर्ण माहिती (घरचा पत्ता, जन्म दिनांक, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र) अचूक भरणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासंदर्भात पालकांना अडचणी आल्यास त्यांनी शहरातील महापालिकेचे प्रशासनाधिकारी, संबंधित तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. आरटीईअंतर्गत मुलांना सवलतीचा प्रवेश देताना एसईबीसी प्रवर्गातील मुलांचा वंचित गटात समावेश करण्यात आला आहे. पालकांनी अर्ज करताना सिंगल पॅरेंट पर्याय निवडला असल्यास संबंधितांनी जोडलेली कागदपत्रे प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex या संकेतस्थळावर पालकांना अर्ज करता येईल अथवा प्रवेशासंबंधीची माहिती पाहता येणार आहे. पालकांनी चुकीची माहिती दिल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तर त्या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केला जाणार असून त्याची संपूर्ण फी पालकास भरावी लागणार आहे. यापूर्वी सवलत घेतलेल्यांना दुसऱ्यांदा संधी नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.