बार्शी तालुक्‍यात सततच्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग पिकांचे नुकसान; पंचनामे करण्याची मागणी 

Vairag
Vairag

वैराग (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यात गेल्या दहा दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीन, उडीद व मूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्‍यात सर्वांत जास्त सोयाबीन पीक पेरलेले आहे. सध्या सोयाबीन पीक काढणीच्या भरात आलेले आहे, त्याच वेळी सतत पाऊस पडत असल्यामुळे तसेच पाणी व रोगट हवामानामुळे सोयाबीनचे पीक झाडालाच नासू लागले आहे. तर काही ठिकाणी सोयाबीनचे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. 

तालुक्‍यातील अशा नुकसान झालेल्या मूग, उडीद व सोयाबीन पिकांचे पंचनामे करावेत, या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार किरण जमदाडे यांना देण्यात आले. या वेळी भास्कर काकडे, प्रमोद पाटील, युवराज काजळे, प्रशांत भड, संदीप भड आदी गौडगावचे व तालुक्‍यातील शेतकरी उपस्थित होते. 

यंदा पाऊस वेळेवर झाल्याने शेतकऱ्यांनी सहा एकर सोयाबीन पेरले. पीक चांगले व काढणीला आले असताना सतत सहा दिवस झालेल्या पावसामुळे व शेतात साचलेल्या पाण्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे उत्कर्ष देशमुख (रातंजन, ता. बार्शी) यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com