कोरोनामुळे "या' भारतीय उपचार पद्धतीकडे आता नागरिकांचा कल 

Ayurveda
Ayurveda
Updated on

अक्कलकोट (सोलापूर) : सध्या भेडसावत असलेल्या कोरोना महामारीची चिंता ही प्रत्येक नागरिकाला सतावते आहे. यातून बाहेर येण्यासाठी आणि आपली सुरक्षितता वाढविण्यासाठी योग व आयुर्वेद उपचार पद्धती वापरण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. कोरोनाची समस्या कमी करणे किंवा ते झाले तर त्यातून लवकर बाहेर येणे यासाठी तालुक्‍यातील बहुतांश जण आता आपल्या शरीराच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देत आहेत. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हे मुख्य उद्देश ठेवून आपली दिनचर्या आखत आहेत. 

कोरोनाच्या भीतीच्या सावटात आपण ओढले जाऊ नये यासाठी प्रत्येकजण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. या चार- पाच महिन्यांत गुळवेल, हळद, तुळस, कोरफड व गवती चहा यांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. जे पूर्वीपासून वापरतात ते दक्ष आहेतच याशिवाय ज्यांना आता याचे महत्त्व पटायला लागले आहे ते सर्वजण यांची रोपे मिळेल तिथून आणून लावत आहेत. त्याचे नीट संगोपन करीत आहेत. याचबरोबर पहाटेपासून चालणे, योगा व प्राणायाम पद्धती अंगीकारली जात असल्याचे चित्र दिसत आहे. आपल्या देशात असणारी आयुर्वेद औषध संपत्ती जगात कुठेच नाही आणि त्याची उपयुक्तता देखील नागरिकांना पटायला लागल्याने आता योग व आयुर्वेद उपचार पद्धती ही एक पर्यायी पद्धती न राहता त्याला मुख्य उपचार पद्धती म्हणून अंगीकारले जात आहे. 

आता नेहमीचा चहा हा वर्ज्य केला जात असून आता त्याची जागा सूंठ, गवती चहा, काळी मिरी, विलायची, लवंग, दालचिनी, ज्येष्ठमध व गूळ यांसारखे वेगवेगळे पदार्थ वापरून त्याचा काढा पिण्याकडे कल वाढतो आहे. त्याचबरोबर दूध व हळद यांचे मिश्रण पिणे हे हितावह ठरते आहे. एकंदरीत, कोरोना काळ हा संकट जरी वाटत असला तरी त्यातून अनेक सकारात्मक व चांगल्या गोष्टी सुद्धा घडत आहेत. नागरिक महागडी औषधोपचार पद्धती टाळण्याच्या मन:स्थितीत दिसत आहेत. आता योग व आयुर्वेद उपचार पद्धती ही येत्या काळात आपल्या आरोग्यासाठी दिशादर्शक बनेल, यात संदेह नाही 

देशातील निसर्ग औषधी जगात कुठेच नाही 
विश्‍व फाउंडेशन, शिवपुरीचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले म्हणाले, भारताची आयुर्वेद पद्धती ही जगन्मान्य होताना दिसत आहे. येत्या दहा वर्षात आयुर्वेद व योग उपचार पद्धती मुख्य प्रवाहात येईल. आता लोकांनाही कळून चुकत आहे की आयुर्वेद ही खात्रीशीर व दीर्घकालीन इलाज पद्धती आहे. आपल्या देशात असणारी निसर्ग औषधी जगात कुठेच उपलब्ध नाहीत. आता येत्या काळात भारताला खूप मोठी संधी आहे. आता याचा लाभ कसा उठवायचा, हे आपण पाहिले पाहिजे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com