"शेतीत अडचणी येणारच, हिंमत हरायचं न्हाय' म्हणणाऱ्या शेतकऱ्यानेच मानली परिस्थितीसमोर हार; केली आत्महत्या

narotewadi shetkari.jpg
narotewadi shetkari.jpg

वडाळा : उत्तर सोलापूर तालुक्‍यातील नरोटेवाडी येथील शेतकऱ्यांने कोरोनामुळे शेतीत लाखो रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागला. यामुळे विषारी तणनाशक पिऊन आण्णासाहेब रामचंद्र गवळी (वय 35) यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. 
सोलापूरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना अखेर गुरुवारी (ता.1) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी पंधरा दिवसापूर्वीच एका यूट्युब चॅनलवरून "शेवगा शेतीत अडचणी येणारच, हिंमत हारायची नाय' असा व्हिडिओ अपलोड केला होता. 

आण्णासाहेब गवळी व त्यांची पत्नी शेती कसत होते. विष्णू व बाळासाहेब हे दोन भाऊ नोकरीला असल्याने घरची 15 एकर जमीन उत्तम पद्धतीने कसून उदरनिर्वाह करीत होते. परिसरात उपक्रमशील शेतकरी व विषमुक्त शेती करण्यावर भर देत होते. मात्र, कोरोना संसर्गजन्य आजार त्यांच्यासाठी काळ बनून आला होता. जानेवारी महिन्यात अडीच एकर क्षेत्रात खरबूज लागवड केली. यावेळी मार्च महिन्यांत कलकत्ता येथील व्यापाऱ्याने दोन टन खरबूज 16 रु. कि.दराने विक्री केली मात्र, कोरोनामुळेला×लॉकडाउन सुरू झाले आणि इथेच गवळ यांच्यामागे नुकसानीचा फेरा चालू झाला. उरलेली 30 टन खरबुज कवडीमोल दामाने विकावी लागली. यामध्ये 6 लाखांचा आर्थिक फटका बसला. मात्र यातुनही सावरत गवळी यांनी अडीच एकर कलिंगड लागवड केली. मात्र यातही कोरोना कडक नियमावलीने कलिंगड बाजारात जाऊ शकली नाहीत. तसेच गेल्या दिवसात सतत पडणाऱ्या पावसामुळे व खराब हवामानामुळे शेतात सर्वत्र तण झाले होते. गवारी, कांदा आशा पिकांचीही खराब वातावरणामुळे मोठे नुकसान झाले आहे. यातही लाखों रुपयांचा फटका बसला. यामध्ये खर्च केलेल्या पिकांची खते, औषधे, मजूरी अंगलट आली. 

कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा या आर्थिक विवंचनेतून आण्णासाहेब गवळी यांनी आपली जीवन यात्रा संपवली. यामुळे गवळी यांची आई, पत्नी, 3 वर्ष याची मुलगी, 6 वर्ष वयाचा मुलगा, दोन भाऊ हताश होऊन अश्रु ढाळत आहेत. मात्र, हे अश्रु पुसण्यासाठी मायबाप सरकारला कधी जाग येणार, असा सवाल परिसरातील शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. 

"शेवगा शेतीत अडचणी येणारच, हिंमत हारायची नाय' 
आण्णासाहेब गवळी हे शेतकरी प्रामाणिकपणे चिकाटीने शेती करत होते. सध्या त्यांनी पाच एकर शेवगा लागवड केली आहे. जिल्ह्यात व महाराष्ट्रातही इतर उपक्रमशील शेतकऱ्यांच्या संपर्कात होते. पंधरा दिवसापूर्वीच त्यांचा शेवगा पिकाबाबत "थिकिंग मांइड' या यूट्युब चॅनल वरुन "शेवगा शेतीत अडचणी येणारच, हिंमत हारायची नाय' असा मार्गदर्शनपर व्हिडिओ अपलोड झाला होता. आपले दु:ख असो अथवा आर्थिक समस्या ते कुणाकडे मांडत नव्हते. नोकरीच्या निमित्तानं बाहेरगांवी असणाऱ्या दोन भावांना ही आपली समस्या सांगितली नाही. यामुळे विष्णु व बाळासाहेब यांनाही आण्णासाहेबची आत्महत्या मनाला चटला लावून गेली असल्याचे विष्णू गवळी यांनी "सकाळ' ला सांगितले. 

महाराष्ट्र सोलापूर वडाळा 
संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com