
सोलापूर : राज्यातील प्रथम व द्वितीय वर्षातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. परीक्षा रद्द झाल्याने आता या विद्यार्थ्यांनी परीक्षा फी परत मिळावी, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी राज्यपाल नियुक्त राज्यस्तरीय समितीकडे विद्यार्थ्यांनी मागणी करावी आणि त्यानंतर ही समिती राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाला आपला अहवाल देणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांना फी परत करायची, की आगामी वर्षातील एका सत्राची परीक्षा फी घ्यायचीच नाही, याबाबत राज्य सरकार निर्णय घेणार आहे.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
2019- 20 या शैक्षणिक वर्षात पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठी तर पदविकेच्या प्रथम व द्वितीय वर्षासाठी राज्यभरातून सुमारे 50 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार होते. त्यामध्ये अंतिम वर्षात नऊ लाख विद्यार्थी तर प्रथम व द्वितीय वर्षासाठी तब्बल 41 लाख विद्यार्थी आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान असल्याने आणि प्रथम व द्वितीय वर्षातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या पाहून राज्य सरकारने या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा रद्द झाल्याने प्रश्नपत्रिकेसह उत्तरपत्रिका व निकालपत्राचा खर्च होणार नसल्याने आमची परीक्षा फी सरकारने परत करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी परत मिळण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या राज्यस्तरीय समितीकडे तथा राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे कळवाव्यात. राज्यस्तरीय समितीकडे आलेली मागणी राज्य सरकारला कळविली जाईल. त्यानंतर परीक्षा फी परत करण्याचा सकारात्मक निर्णय होईल.
- डॉ. देवानंद शिंदे, सदस्य, राज्यपाल नियुक्त राज्यस्तरीय समिती
41 लाख विद्यार्थ्यांची दोन हजार कोटींची परीक्षा फी
2019-20 मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 50 लाख आहे. त्यामध्ये प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 41 लाख इतकी आहे. तर अंतिम वर्षातील नऊ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामध्ये प्रथम व द्वितीय वर्षातील एकूण विद्यार्थ्यांची सरासरी परीक्षा फी दोन हजार कोटींहून अधिक आहे. रद्द झालेली परीक्षा आणि राज्यभरातील सद्यस्थिती पाहता आमची पण परत मिळावी, ही मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे, असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.