सोलापूर : रिक्षा बस थांबे, एसटी स्टॅड, रेल्वे स्टेशनसह भाजीपाला, किराणा दुकान यांना १४४ कलम मधून वगळण्यात आले आहे. कोरोनाचा प्रदार्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जमावबंदीचा (कलम १४४) आदेश लागु केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
याच्याबाबत अनेक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, मात्र याने घाबरायचे कारण नाही. कारण यातून सरकारने अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी आदेश काढून प्रसिद्ध केला आहे. १४४ च्या आदेशातून काय वगळले आहे, याची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. पुणे आणि मुंबईमध्ये कामधंदा, शिक्षण, नोकरीसाठी गेलेल्यांची संख्या जास्त आहे. आणि आता कोरोनाच्या भितीने हा लोंढा आता गावाकडे निघाला आहे. मात्र, यामुळे कोरोना पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार विविध उपाय योजना करत आहे. त्याचाच भाग म्हणून रेल्वे, एसटी व खासगी बसची वाहतुकसेवाही बंद केली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात काय बद असणार आणि काय सुरु असणार याबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आदेश काढला आहे.
यांना आदेश लागु नाही
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.