सोलापूर : आपल्याबरोबर समाजाची व प्रत्येक नागरिकाची काळजी घेणे सर्वांना बंधनकारक आहे. मग हा नियम बेघर व गरजवंतांना अन्नदान करतानाही लागू आहे. यावर तोडगा म्हणून जय हिंद फूड बॅंक व्हॅनसोबत ट्रे साथीला आला. यामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येता गरजवंतांना जेवण दिले जात आहे.
अन्नपूर्णा फाउंडेशन संचलित जय हिंद फूड बॅंकेच्या माध्यमातून लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गेल्या 70 दिवसांपासून दररोज 650 ते 700 गरजू व बेघर लोकांना जेवण दिले जात आहे. हे सामाजिक कार्य करत असताना प्रत्येक सदस्याचा जीव टांगणीला लागलेला असतो. कधी कुणाच्या संपर्कात आल्यावर कधी या महाभयंकर रोगाची लागण होईल, याची कल्पना न केलेली बरी. अशा परिस्थितीतसुद्धा जय हिंदने दोन महिन्यांपासून योग्य ती काळजी घेत, सुरक्षा साधने वापरत हे कार्य चालू ठेवले आहे.
एक वेळ अशी होती, की आपल्या हाताने या भुकेल्यांना घास भरवला जात होता, पण आज त्यांना लांबून जमिनीवर ठेवून जेवण द्यावे लागत आहे. एकीकडे शासनाचे नियम पाळणे आवश्यक आहे आणि दुसरीकडे गरजूंना जमिनीवर ठेवून जेवण देणे, हे जय हिंदचे संस्थापक सतीश तमशेट्टी यांना पटले नाही. यावर तोडगा म्हणून त्यांना एक संकल्पना सुचली आणि त्या संकल्पनेतून जय हिंद फूड बॅंक व्हॅनसाठी फूड ट्रे साथीला आला. हा ट्रे मुव्हेबल असून वापर झाल्यानंतर ते सॅनिटायझ करून काढून ठेवता येतो. व्हॅनमधून खिडकीची काच लावून जेवण ट्रेमधून देता येते आणि देत असताना मागील बाजूस खिडकीतून ट्रेमध्ये फूड पॅकेट ठेवल्यास ते खाली सरकत खालच्या ट्रेमध्ये जमा होतात. त्या ट्रेमधून गरजवंत त्याला लागेल तेवढे अन्न घेऊन पुढे जातो. यामध्ये जो खालचा ट्रे आहे तो आणि खिडकीमधील अंतर जवळपास चार फुटांपर्यंत ठेवण्यात आले आहे.
फूड ट्रेचे फायदे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.