अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : आमदार शहाजी पाटील

Crop Damage
Crop Damage

सांगोला (सोलापूर) : तालुक्‍यामध्ये बुधवारी (ता. 16) झालेल्या अतिवृष्टीमध्ये अनेक नागरिकांच्या घरांचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संबंधित नुकसानीचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून अहवाल शासनास सादर करावा, अशा आशयाचे लेखी पत्र आमदार शहाजी पाटील यांनी तहसीलदार यांना दिले आहे. 

सांगोला तालुक्‍यामध्ये बुधवारी (ता. 16) मुसळधार पाऊस पडल्याने तालुक्‍यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे, नागरिकांच्या घरांचे व जनावरांचे मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका असल्याने येथील शेतकऱ्यांचे जीवन हे शेतीवर मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर अवलंबून असते. यामध्ये देखील निसर्गाने घात केला तर शेतकऱ्यांचे जीवन हे विस्कळित होऊन जाते. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व नवी उमेद मिळण्यासाठी शासनाकडून नुकसान भरपाई मिळणे गरजेचे असते. त्यामुळे बुधवारी झालेल्या पावसामुळे तालुक्‍यातील ज्या ठिकाणी पिके व घरांचे नुकसान झाले आहे त्या सर्व ठिकाणचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करावा; जेणेकरून संबंधित नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई शासनाकडून मिळू शकेल, असा आशयाचे लेखी पत्र आमदार शहाजी पाटील यांनी तहसीलदार योगेश खरमाटे यांना दिले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com