सरकारची मानसिकता नसल्यानेच मराठा आरक्षणाला स्थगिती : धैर्यशील मोहिते-पाटील

Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite Patil

अकलूज (सोलापूर) : मराठा आरक्षण टिकवण्याची सरकारची मानसिकता नसल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. या स्थगितीमुळे मराठा समजातील घटकांना फटका बसणार आहे. याला महाविकास आघाडीचे शासन जबाबदार असल्याचे मत भाजपचे नेते धैर्यशील मोहिते - पाटील यांनी व्यक्त केले. 

धैर्यशील मोहिते - पाटील म्हणाले, सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत बाजू मांडण्यासाठी केलेला उशीर व हवी तितकी तत्परता दाखविली नसल्याने स्थगिती मिळाली असून यामुळे समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण राहणार नाही. यामुळे समाजाचे अतोनात नुकसान होणार आहे. सरकारची खरंच आरक्षण टिकवण्याची मानसिकता असती तर आज आरक्षणाला स्थगिती मिळालीच नसती. सरकारने सकल मराठा समाजाची शुद्ध फसवणूक केली आहे. 

शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास कायद्यांतर्गत मराठा समाजाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आरक्षण देण्यात आले होते. हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी महाविकास आघाडीची होती. पण सरकारने जाणीवपूर्वक आरक्षणाचा प्रश्न किचकट केला आहे. या सरकारने सारथी संस्थेला सुद्धा तुटपुंजी मदत करत मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असे म्हणत श्री. मोहिते - पाटील यांनी, मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याची टीका केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com