माळशिरस येथे कोरोनामुळे नवरात्र महोत्सव व्याख्यानमालेची परंपरा होणार खंडीत

navratri_
navratri_

माळशिरस (सोलापूर) : माळशिरस येथील नवरात्र महोत्सव सांस्कृतिक मंडळाच्यावतीने प्रत्येक वर्षी आयोजित केली जाणारी नवरात्र महोत्सव व्याख्यानमाला होणार नाही. कारण कोरोनाच्या महामारीमुळे तसेच या मंडळाचे अध्यक्ष साहेबराव सुग्रीव पाटील यांच्या निधनामुळे यावर्षी व्याख्यानमालेची परंपरा खंडीत होणार असल्याची माहिती व्याख्यानमालेचे संयोजक एन.डी.पाटील यांनी दिली.
 
येथील नवरात्र महोत्सव सांस्कृतिक मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी नवरात्र महोत्सव व्याख्यानमाला आयोजित केले जाते. या व्याख्यानमालेची सुरवात सन 1972 साली सुरु झाली. गेली 49 वर्षे ही व्याख्यानमाला आजतागायत सुरु आहे. परंतु यावर्षी कोरोनाचे संकट तसेच मंडळाचे अध्यक्ष साहेबराव सुग्रीव पाटील यांच्या निधनामुळे या व्याख्यानमालेची परंपरा खंडीत करण्याची दुर्देवी वेळ या मंडळावर आली आहे.
 
या मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आजपर्यंत या मंडळासाठी राज्यातील दिग्गज साहित्यीकांनी व्याख्यानमालेसाठी उपस्थित राहून समाज प्रबोधन केले आहे. शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु प्राचार्य कै.शिवाजीराव भोसले यांनी सतत 33 वर्षे माळशिरसमध्ये व्याख्याने दिली आहेत. 1972 साली त्यांच्याच व्याख्यानाने या व्याख्यानमालेस सुरवात झाली.
 
त्यांच्याशिवाय राज्यातील ना.ग.गोरे, ग.प्र.प्रधान, माजी आमदार गणपतराव देशमुख, मराठी चित्रपट अभिनेते सूर्यकांत व चंद्रकांत मांढरे हे सख्ये बंधू, विनोदी अभिनेता गणपत पाटील, गीतकार जगदीश खेबूडकर, वसुंधरा मेहेंदळे, सरल बाबर, अपर्णा रामतीर्थकार आदी वक्तयांनी या व्याख्यानमालेत विविध विषयावर व्याख्याने देऊन समाज प्रबोधन करुन व्याख्यानमाला सातत्याने पुढे सुरु राहण्यास मोलाचे सहकार्य केले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com