बिबट्या-मानवातील संघर्षावर निघणार तोडगा ! तांत्रिक अभ्यास गटाची नियुक्ती; तीन महिन्यांत येणार अहवाल
सोलापूर : गेल्या दोन वर्षांत बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बिबट्या व माणसातील संघर्षाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्याच्या महसूल व वन विभागाने तांत्रिक अभ्यास गटाची नियुक्ती केली आहे. या अभ्यास गटाच्या माध्यमातून तीन महिन्यांत सरकारला अहवाल मिळणार आहे. त्यानंतर सरकारच्या वतीने कृती आराखडा तयार केला जाणार आहे.
वन्यजीवचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमध्ये बिबट्याविषयी दीर्घकालीन अभ्यास करणाऱ्या डॉ. विद्या अत्रेय, डॉ. बिलाल हबीब, डॉ. अनिष अंधेरिया, बंडू धोत्रे, अनुज खरे, शिवाजी फटांगरे, नेहा पंचमिया, विश्वास काटदरे, स्वप्नील सोनोने यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नगरचे प्रादेशिक उपवनसंरक्षक एम. आदर्श रेड्डी यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बिबट्यांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास ही समिती करणार असून, त्याचे विश्लेषण करून मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शक्य असलेल्या उपाययोजना शासनाला सुचविणार आहे.
भूमिकेचा होणार अभ्यास
बिबट्या व मनुष्यामधील संघर्षाच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीचा अभ्यास करणे, बिबट्या व मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी काळजी घेण्याबाबत उपायोजना सुचविणे, बिबट्या व माणसातील संघर्षाला तोंड देण्यासाठी वन विभागाला उपाययोजना सुचवणे, इतर विभागांच्या भूमिकेचा अभ्यास करून त्यांच्या क्षमता विकासासाठी उपाययोजना सुचविणे, देशातील इतर ठिकाणी घेण्यात आलेल्या साधक बाधक उपाययोजनांचा अभ्यास देखील ही समिती करणार आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.