उजनी धरण मेच्या दुसऱ्या पंधरवाड्यात वजा १० टक्क्यावर

उजनी धरण मेच्या दुसऱ्या पंधरवाड्यात वजा १० टक्क्यावर

सोलापूर ः उजनी धरण मे महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात वजामध्ये आले आहे. आज सकाळी सहा वाजता धरणात वजा 10 टक्के इतका पाणीसाठा होता. त्याचबरोबर सध्या कालवा व बोगद्याच्या माध्यमातून शेतीसाठी पाणीपुरवठा सुरु आहे. पण, या दोन्ही ठिकाणहून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आला आहे. 
जिल्ह्याची वरदायिनी म्हणून उजनी धरणाकडे पाहिले जाते. यंदा मे महिन्यात सोडलेले पाणी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये हे पाणी मिळाल्याने ऊस या प्रमुख पिकासाठी ते फायदेशीर ठरले आहे. याशिवाय काही फळबागांचे क्षेत्र त्यामुळे वाचण्यास मदत झाली आहे. येत्या महिना अखेरपर्यंत धरणातून कालवा व बोगद्यातून पाणी सोडणे सुरु राहण्याची शक्‍यता आहे. 

दक्षिणमधील शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी 
दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील काही शेतकऱ्यांनी टेल टे हेड या पद्धतीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत शेवटी पाणी पोचले जात नाही तोपर्यंत कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी कमी करण्यात येऊ नये, अशी मागणीही त्या शेतकऱ्यांनी केली आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com