ऊसाची गाडी कारखान्यावर आल्यावर आगोदर वजन, मगच नंबर 

logo
logo

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळित हंगामाला आता सुरुवात होऊ लागली आहे. यंदाच्या हंगामापासून ऊसाच्या वजनाबाबत काही बदल करावेत अशी मागणी सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. ऊस घेऊन आलेले वाहन कारखान्यावर आल्यानंतर तत्काळ ऊसाचे वजन करावे. त्यानंतरच ऊस गाळपासाठी वाहनाचा नंबर लावावा अशी प्रमुख मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. 

या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, वजनमापे विभाग व साखर सहसंचालक कार्यालयाला देण्यात आले आहे. यावेळी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पप्पू पाटील, इक्कबाल मूजावर, सचिन मस्के, सचिन राऊत उपस्थित होते. वजनाची पावती ऑटो जनरेटेड स्वरुपात वेईन्ग मशीनवरील पावती वाहन धारकाकडे (मालकाकडे) देण्याची व्यवस्था करावी, शेतकऱ्याला वजन काट्यापर्यंत येण्यास मज्जाव केला जातो. वजन काट्याजवळ माहिती फलक लावण्याची कारखान्यांना सक्ती करावी.

वजन काट्याच्या वैधतेबद्दल कोणालाही सॅम्पल वजनाद्वारे खात्री करण्याची मुभा असावी (तसा फलक लावावा), शेतकऱ्याला वजनाबाबत तक्रार करायची झाल्यास कोणाकडे करावी? त्याची माहिती दर्शविणारा फलक काट्याशेजारी अधिकाऱ्यांच्या मोबाईल नंबरसह लावावा. बाहेरच्या काट्यावर शेतकऱ्याने वजनाच्या खात्रीसाठी वजन केल्यास कारखाना असे वाहन नाकारतो. त्याबाबत कारखान्यांना सूचना कराव्यात. ऊस नियंत्रण आदेशानुसार वजनकाटे हे इलेक्‍ट्रॉनिक व ऑटो जनरेटेड असावेत, वजन करण्याच्या व पावती देण्याच्या प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप असू नये अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com