अंत्यसंस्कारासाठी येताहेत इंडीहून लाकडे

 Wood from Indy is coming for the funeral
Wood from Indy is coming for the funeral
Updated on

सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनच्या कालावधीत निधन झालेल्या मृतदेहांवर अग्निसंस्कारासाठी सध्या सोलापुरातील वखार बंद असल्यामुळे लाकडे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अंत्यविधी साहित्य विक्रेत्यांना कर्नाटक राज्यातील इंडी येथून लाकडे मागवून अग्निसंस्कार उरकावे लागत आहेत. 


लॉकडाउनमुळे स्वतःच्या आई-वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही परगावी, परजिल्ह्यात नोकरी-व्यवसायासाठी गेलेल्या मुलांना उपस्थित राहता न आल्याने, मयताच्या पत्नीलाच पतीच्या चितेला मुखाग्नी देण्याची वेळ आली होती. आता तर लॉकडाउनमुळे लाकडाचे वखार बंद असल्याने मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडांची टंचाई निर्माण झाल्याने मृतदेहावर करावयाच्या अग्निसंस्काराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यातच लाकडे मिळत नसल्याने पद्मशाली समाजाच्या शांती धाम येथील अंत्यविधी साहित्य विक्रेता वेणुगोपाल कोडम यांनी मजुरांकडून ओसाड मैदानावर वाढलेल्या काटेरी बाभळीचे झाडे तोडून अग्निसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकडांची व्यवस्था केली होती. मात्र रोज तीन-चार तर कधी सहा-सात मृतदेहांवर अग्निसंस्काराची वेळ येत असल्याने बंद वखारी उघडायला लावून मिळेल तेवढ्या लाकडांवर अग्निसंस्कार उरकले गेले. 


कर्नाटकातील लाकडाची वखारे सुरू असल्याने श्री. कोडम यांना कर्नाटकातील इंडी येथून एका खेपेला दोन टन असे आठवड्यातून दोन-तीन खेप गाड्या लाकडे मागवून अग्निसंस्काराची व्यवस्था करावी लागत आहे. लाकडे मागवण्यासाठी वाहनाचा ई-पास काढून लाकडांचा वाहतूक खर्च, चालकाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अडवले व दंड भरल्याचा खर्च मात्र श्री. कोडम यांना सहन करावा लागत आहे. 


शांती चौक येथील पद्मशाली समाजाच्या शांती धाम स्मशानभूमी येथे विद्युत वा डिझेल दाहिनी नाही. अग्निसंस्कारासाठी लाकडांवर अवलंबून राहावे लागते. लॉकडाउन सुरू होण्याअगोदरच श्री. कोडम यांनी अंत्यसंस्कारासाठी लागणारी तीन हजार किलो लाकडे जमा करून ठेवली होती. मात्र 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन संपेल, असे वाटत असतानाच 3 मेपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला.

दरम्यान, अग्निसंस्कारासाठी लाकडे मात्र संपली आहेत. लाकडाचे वखार बंद असल्याने, यापुढे अग्निसंस्कार कसे पार पडणार, याबाबत मोठे प्रश्‍नचिन्ह आता निर्माण झाले आहे. कारण, अंत्यसंस्कार साहित्य विक्री अत्यावश्‍यक सेवेत मोडत असेल, मात्र लाकडे पुरवणारे वखार मात्र बंद असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. 

  • ठळक 
  • एका अंत्यसंस्कारासाठी 150 ते 200 किलो लाकडांची गरज 
  • लाकडाचे वखार बंद असल्याने उपलब्धता नाही 
  • वखार चालक म्हणतात आम्हाला वखार सुरू करण्याची परवानगी नाही व कामगारही येत नाहीत 
  • काटेरी बाभळीची झाडे तोडून होतेय अग्निसंस्काराची व्यवस्था 
  • आता कर्नाटकातील इंडी येथून मागविले जात आहेत लाकडे 

काही वेळा येतात अडचणी
अग्निसंस्कारासाठीचा लाकडाचा साठा संपून महिना झाला, मात्र शहरातून लाकडे मिळत नाहीत. मजुरांकडून बाभळीची झाडे तोडून लाकडांची व्यवस्था करावी लागली. आता कर्नाटकातील इंडी येथून लाकडांचा पुरवठा होत आहे. त्यातही काही वेळा अडचणी येत आहेत. 
- वेणुगोपाल कोडम, अंत्यविधी साहित्य विक्रेता 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com