

"पुण्या-मुंबईत २ तासात पाईपलाईन दुरुस्त होते, मग पाटणमध्ये का नाही?" पालकमंत्री शंभुराज देसाईंचा पाटणकरांना नाव न घेता टोला; पाणी प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले
कऱ्हाड ः पाटण नगरपंचायत ज्यांच्या ताब्यात आहेत त्या नेतृत्वाने पदाधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये एखादी पाईपलाईन फुटल्यास दोन-चार तासात दुरुस्त केली जाते. पाटण सारख्या ठिकाणी ते तात्पर्य का दाखवले जात नाही. त्यासाठी हिरेरीने काम करण्याची मानसिकता हवी असा टोला साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी पाटणकर यांना नाव न घेता लगावला. पाटण नगर वासीयांना पाणी मिळाले पाहिजे, यासाठी मी ठेकेदार आणि मुख्याधिकाऱ्यांना बोलावून तात्काळ काम मार्गी लावण्याचे सूचना देणार असल्याचेही पालकमंत्री देसाई यानी स्पष्ट केले.