
कडेगाव-कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर ऊस तोडणी मजुरांची काळजी व दक्षता संबंधित साखर कारखान्यानी घ्यावी. तसेच मजुरांच्या आरोग्यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा. जे कारखाने ऊस तोड मजुरांची काळजी घेणार नाहीत त्या कारखान्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
ते म्हणाले, ""कोरोना आणि लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर ऊस तोड मजुरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्याबाबत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याशी चर्चा करणार असून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. तत्पुर्वी ऊस तोड मजुरांची योग्य ती काळजी संबंधित साखर कारखान्यानी घेणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधासाठी कडेगाव व पलूस तालुक्यातील प्रांताधिकारी, दोन्ही तहसीलदार, प्रशासन, आरोग्य विभाग युद्ध पातळीवर कौतुकास्पद काम करीत आहेत. दोन्ही तालुक्यात उत्कृष्ट कामगिरी होत आहे.''
ते पुढे म्हणाले, ""सध्या शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतीसाठी हा अत्यंत अडचणींचा काळ आहे. परंतु शेतकऱ्यांनी घाबरू नये. महाविकास आघाडी सरकार आपल्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत मी राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, खासदार शरद पवार यांच्याशी बोललो आहे. कोरोनाच्या संकटावर आपण एकजुटीने मात करू. कोणीही घराबाहेर पडू नये स्वतःची काळजी घ्यावी. सध्या कडेगाव व पलूस तालुक्यातील आरोग्य विभाग अतिशय उत्तम काम करत आहे. कडेगाव नगरपंचायतीच्या स्वतंत्र आरोग्य विभागासाठी पाठपुरावा करणार आहे.''
सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम आणि इतर यावेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.