शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार वाटप होणार नाही

afternoon lunch for students not give in belgaum for the precaution of corona in belgaum
afternoon lunch for students not give in belgaum for the precaution of corona in belgaum

बेळगाव : एक जानेवारीपासुन टप्पाटप्पाने शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. मात्र शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला तरी या शैक्षणिक वर्षांत मध्यान्ह आहाराचे वाटप न करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने सुरु केला आहे. आहारा ऐवजी प्रत्येक महिन्याचे धान्य विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. परंतु 2021 - 22 च्या शैक्षणिक वर्षात नेहमीप्रमाणे शाळेत विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहाराचे वितरण केले जाणार आहे. 

2020 चे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास विलंब होणार असल्याने ऑगस्टमध्ये जुन व जुलैचे धान्य विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहे. तर ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्‍टोंबर महिन्याचे धान्य लवकरच वितरीत केले जाणार आहे. यावेळी धान्याबरोबरच तेल व मिठही ऑगस्टपासूनच देण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार मार्च 2021 पर्यंत धान्याबरोबरच तेल व मिठाचे वाटप केले जाणार आहे.

पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार योजनेअंतर्गंत सोमवार ते शुक्रवारी दुपारचे जेवण उपलब्ध करुन दिले जाते. तर शनिवारी पुलाव किंवा उप्पीट दिले जाते. मात्र यावेळी सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन तयार जेवण विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे तयार आहार न देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. अशी माहिती अक्षर दासोस योजनेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

अक्षर दासोस योजना लागु झाल्यापासुन राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना योजेनचा लाभ होत आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना किंवा पालकांना शाळेत बोलावून सामाजिक अंतर राखत जून व जुलै महिन्याच्या तांदूळ व इतर धान्याचे वाटप करण्यात आले होते. आता विद्यार्थ्यांना धान्यासह तेल व मीठ वाटप करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार लवकरच धान्यासह तेल व मीठ पाकीट विद्यार्थ्यांना वितरीत केले जाणार आहे. सध्या ऑगस्ट ते नोंव्हेबर पर्यंतचे धान्य वाटप शिल्लक असुन तयार आहार न देण्याचा निर्णय फक्‍त यावर्षीच्या शैक्षणिक वर्षासाठी घेतला जाणार आहे. 


"सध्या तीन महिन्यांचे धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा विचार करुन मध्यान्ह आहार वाटप करण्यास अडचण निर्माण होणार असल्याने तयार जेवण न देण्याचा निर्णय होऊ शकतो."

- बसवराज मिलानट्टी, जिल्हा समन्वयक माध्यान्ह आहार योजना

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com