
आष्टा : ‘‘भारताने पाकव्याप्त काश्मीर परत घेऊन पाकिस्तानला चांगला धडा शिकवायला पाहिजे होता. भारतीय जनतेची ही अपेक्षा राज्यकर्ते पूर्ण करू शकले नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या अद्वितीय राज्य घटनेमुळे अनेक संकटांना सामोरे जाऊनही आपल्या देशाचे ऐक्य अबाधित आहे. त्यांच्या विचारांशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही,’’ असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी केले.