ralegan
ralegan

आण्णा हजारे यांनी आपले ऊपोषण मगे घेतले

राळेगणसिद्धी - लोकपाल व लोकायुक्तसाठी शोध समिती स्थापन केली आहे. लवकरच त्यांची नेमणुक करू व निवडणुक कायद्यात सुधारणा, शेती औजारे आणि ठिबक संच य़ंत्रणा यावरील जी.एस.टी. 12 टक्याऐवजी पाच टक्के करण्या बाबत  महात्मा गांधी यांच्या पुण्यातीथी म्हणजे 30 जानेवारी पर्यंत निर्णय घेऊ असे अश्वासन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन केंद्र सरकार व मुख्यमंत्र्यांचे दूत या नात्याने दिले. मुख्यमंत्र्यांचे संदेशपत्र देऊन हजारे यांच्याशी बोलणी करून दिल्यानंतर जेष्ठ समाज सेवक हजारे यांचे समाधान झाले. त्यानंतर हजारे यांनी आज सुरू करण्यात येणारे ऊपोषण तुर्त स्थगित करित असल्याचे जाहीर केले.

हजारे आपल्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिद्धी येथे आज (ता. 2 ) ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती पासून माझा गाव माझे आंदोलन या धर्तीवर बेमुदत ऊपोषणास बसणार होते. त्या पार्श्वभूमिवर महाजन आज सकाळी सव्वा आठ वाजता येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्र सरकार व पंतप्रधान कार्यलयाचे दुत म्हणून हजारे यांच्या तिस-यांदा भेटीस आले होते. मात्र या वेळेची महाजन यांची शिष्टाई यशस्वी झाली व हजारे यांचे ऊपोषण तुर्तास तरी स्थगीत झाले.

त्यांनी आपल्या सोबत मुख्यमंत्र्यांचे पत्र आणले होते ते दिल्यानंतर त्यांच्याशी बोलणीही करूण दिली. सुमारे आडीच तास हजारे यांच्याशी विविध मागण्यांबाबत महाजन यांनी चर्चा केली व शेवटी ऊपोषणावर तोडगा निघाला. 

देशात लोकपाल व राज्यात लोकायुक्तांची नेमणुक लवकरच  केली जाईल कारण अता न्यायमुर्ती रंजण देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती नेमली आहे. तसेच काही शेतीमालाला ऊत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव सरकारने जाहीर केला आहे. स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी वयोवृद्ध शेतक-यांना पेन्शन मिळावी निवडणुक कायद्यात सुधारणा व शेती औजारावरील जी एस टी दुधाच्या दराबाबत  लवकरच निर्णय घेण्याचे हजारे यांना अश्वासन दिल्यानंतर हजारे यांचे मागण्यांबाबत समाधान झाले. त्यांनी महात्मा गांधी पुण्यातीथी पर्यंत म्हणजे 30 जानेवारीपर्यंत आपले ऊपोषण स्थगीत केले. मात्र जर तो पर्यंत सरकारने कार्यवाही केली नाही तर पुन्हा 30 जानेवारीला ऊपोषण करण्याचे या वेळी हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.

हजारे यांच्या बहुतांशी मागण्या मागण्या पुर्ण झाल्या आहेत. काही मागण्या बाबत सरकारने ठोस पाऊले ऊचली आहेत. त्यातील काही छोट्या मागण्याच शिल्लक आहेत. त्यामुळे त्याही लवकरच पुर्ण करण्यात येतील व 30 जानेवारीला हजारे यांनी ऊपोषण करण्याची वेळ येणार नाही असेही महाजन पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

केंद्रात लोकपालची नियुक्ती झाल्या नंतर लगेचच देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात लोकायुक्ताची नेमणुक करूण देशातील इतर राज्यांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला जाईल त्याच परिणाम देशभरातील इतर राज्यातही त्याची आपोआप सुरूवात होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारे यांना फोनवरून बोलताना सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com