

farmer loss
sakal
आटपाडी : तालुक्यात आज सायंकाळी प्रचंड वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पावसाचे प्रमाण कमी असले, तरी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तालुक्यातील पूर्व भागात आंब्याची मोठी पडझड झाली असून, जवळपास ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. अनेक बागांत जमिनीवर आंब्यांचा अक्षरश: खच पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.