केळीच्या बागेतच घट लागले नासू 

TNG20A01301.jpg
TNG20A01301.jpg
Updated on

तुंग, ( सांगली)  : केळी नाशवंत फळ आहे. वेळेत काढणी व उठाव न झाल्यास घड खराब होतो. सण व यात्रेचे दिवस असल्याने उठाव होईल या आशेवर उत्पादक होते. गतवर्षी महापूर व अतिवृष्टीने खचलेले शेतकरी कोरोनाने केळीबागायतदार धास्तावले आहेत. प्रशासनाने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी महेश कापसे यांनी व्यक्त केली. 
महापुर, आतिवृष्टी आणि आता कोरोनामुळे काढणीस आलेल्या सात एकर केळी बागेचे नुकसान होणार आहे.

व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन केळीचा उठाव करावा. प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी नथु मोरे यांनी केली. त्यांनी पिकलेली केळी 10 रुपये डझनप्रमाणे गावात विकण्यास सुरवात केली आहे. केळीचा लागण हंगाम वाया गेला तर खोडवा घेणेही मुश्‍कील होणार आहे. लाखोंचा खर्च वाया जाण्याची भिती आहे. जिल्ह्यात केळी चिप्स बनवणा-या उद्योजकांनी एक पाऊल टाकावे. प्रशासनाने परवानगी देऊन केळी उत्पादकांना संकटातून बाहेर काढावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

कोट : 

""शेतकऱ्यांचा माल घेऊ, पण तो विकायचा कोठे हे प्रशासनाने सांगितले पाहिजे. 
एकीकडे विक्रीसाठी आदेश आहेत पण बंदोबस्त यंत्रणा मात्र केळी विक्री करणाऱ्याना मारहाण करत आहे. केळी न विकल्या गेल्यास आमचेही नुकसान होणार आहे.'' 

-संतोष देसाई, व्यापारी 
केळी उत्पादक संकटात 

चौकट 
तालुका निहाय क्षेत्र 
मिरज -194 हेक्‍टर 
पलूस - 265 हेक्‍टर 
कडेगाव- 35हेक्‍टर 
खानापूर -167 हेक्‍टर 
शिराळा -10 हेक्‍टर 
वाळवा -100 हेक्‍टर 

कोट- 

""केळी उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी संपर्क करावा. शेतकऱ्यांचा माल पोहोचवण्यासाठी सर्व प्रकारची मदत केली जाईल.'' 

-बसवराज मास्तोळी, जिल्हा कृषी अधिकारी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com