बेळगाव : बायपासची स्थगिती कायम, महामार्ग प्राधिकरण तोंडघशी

शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी महामार्ग प्राधिकरणाचे सर्व दावे खोडून काढल्यामुळे कामाला स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.
Court
CourtSakal

बेळगाव : हलगा मच्छे बायपासला न्यायालयाने स्थगिती दिलेली असतानाही गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी बायपासचे काम सुरू करण्यासंदर्भात परवानगी देण्यासाठी न्यायालयात बाजू मांडली मात्र शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी महामार्ग प्राधिकरणाचे सर्व दावे खोडून काढल्यामुळे कामाला स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.

हलगा मच्छे बायपासला शेतकऱ्यांचा पूर्ण विरोध असताना देखील दडपशाहीकरीत काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत कामाला विरोध केला होता. तसेच याबाबत न्यायालयात धाव घेतली होती त्यानंतर न्यायालयाने शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत झिरो पॉईंट निश्चित केल्याशिवाय बायपासचे काम सुरू कराता येणार नाही असे सांगत कामाला देण्यात आलेली स्थगिती कायम ठेवली होती.

Court
सांगली : २१ कोटी निधी खर्चासाठी विकास आघाडी-राष्ट्रवादीची सहमती

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कामाला विलंब झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली होती मात्र शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी महामार्ग प्राधिकरणाचे सर्व दावे खोडून काढत शेतकऱ्यांवर कशाप्रकारे अन्याय होत आहे हे निदर्शनास आणून दिले होते त्यामुळे कामाला स्थगिती मिळाल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.मात्र पुन्हा एकदा प्राधिकरणाकडून स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत काम बंद झाल्यामुळे नुकसान सहन करावे लागत असल्याचे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न प्राधिकरणाकडून केला जात आहे.

मात्र न्यायालयाने पुन्हा एकदा कामाला स्थगिती कायम ठेवली आहे. बायपासच्या विरोधात 50 हून अधिक शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच इतर शेतकऱ्यांचाही या कामाला पूर्णपणे विरोध असून कोणत्याही परिस्थितीत काम सुरू होऊ नये अशी अपेक्ष शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. मात्र न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे काम बंद असले तरी प्राधिकरणाकडून विविध प्रकारे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने शेतकऱ्यांनी सजग राहणे गरजेचे आहे असे मत व्यक्त होत आहे.

Court
अकोला : मनपा निवडणुकीला ओबीसी आरक्षणाची बाधा!

बायपासमूळे शहर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात सुरू होणार असल्याने बायपास रद्द व्हावा यासाठी म ए समितीच्या कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनाही प्रयत्न करा अशी मागणी केली आहे त्यानुसार पवार हे लवकरच रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या बरोबर चर्चा करणार आहेत. त्यामुळे सर्व बाजुनी रस्त्याचे काम बंद व्हावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com