
बेळगाव : बारावी परीक्षेसाठीही गणवेश सक्ती, हिजाब वादामुळे निर्णय
बेळगाव : दहावी परिक्षेनंतर आता बारावी परीक्षा वेळीही विद्यार्थ्यांना गणवेश सक्ती करण्यात आली आहे. तसेच गणवेशा व्यतिरिक्त इतर प्रकारचा पेहराव परिधान करून घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर दाखल करून घेतले जाणार नाही असे शिक्षण खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात हिजाब परिधान करण्यावरून वाद सुरू आहे. तसेच न्यायालयाने देखील सरकारने केलेली गणवेष सक्ती योग्य असल्याचा आदेश बजावला होता. त्यानंतर २८ मार्चपासून सुरू झालेल्या दहावीच्या परिक्षेवेळी हिजाब परिधान करून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थांनी गणवेष परिधान करून परीक्षा केंद्रावर पोहचत आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
२२ एप्रिल पासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. यावेळी विविध माध्यमाचे लाखो विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार असून या परीक्षेवेळी कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये. या करिता विद्यार्थ्यांना गणवेशची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेष परिधान करून परीक्षा केंद्रांवर यावे लागणार आहे. बारावीची परीक्षेची 22 एप्रिलला सुरूवात होऊन 18 मेला परीक्षेचे सांगता होणार आहे. त्यामुळे या काळात पोलिसांनाही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दखल घ्यावी लागणार आहे.
मुस्लिम समाजातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात हिबाब परिधान करतात. मात्र बारावीची परीक्षा अतिशय महत्त्वाची असल्याने विद्यार्थीनिनी इतर गोष्टींकडे लक्ष न देता परीक्षा देणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त होत आहे.
मिलिंद देसाई
Web Title: Belgaon Uniform Compulsion 12th Exam Decision Hijab Controversy
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..