बेळगाव : ७.५२ लाख हेक्टरमध्ये होणार पेरणी

यंदाच्या खरीप हंगामात ३५,९७८ हेक्टरची पडणार भर
 पेरणी
पेरणीsakal

बेळगाव : यंदा मॉन्सूनपूर्वीच वळीव पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने जिल्ह्यात पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे. कृषी खात्याच्या अंदाजानुसार, यावर्षी खरीप हंगामात ३५,९७८ हेक्टर प्रदेशाची भर पडणार आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात ७.१६ लाख हेक्टर प्रदेशात पेरणी केली जाते. मात्र, यावर्षी ७.५२ लाख हेक्टर प्रदेशात पेरणी होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरीही मागील दोन वर्षांत खरीप आणि रब्बी हंगामात पाऊस होत असल्यामुळे ३६.२ टक्क्याने पेरणीचे क्षेत्र वाढत आहे. यंदा मे महिन्यात आतापर्यंत सरासरी ३०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागतीचे काम हाती घेतले आहे. तसेच पेरणीसाठी बियाणे आणि रासायनिक खतांचीही खरेदी केली जात आहे. मागील चार वर्षांपासून जरी पेरणीचे क्षेत्र वाढत असले, तरी अवेळी पाऊस, हवामानात सातत्याने होणारे बदल या कारणांमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट दिसून आली आहे. तरीही यावर्षी जिल्ह्यात शेंगा, सूर्यफूल व सोयाबीन या पिकांची पेरणी वाढणार आहे.‌

मागील वर्षी जिल्ह्यातील ३५ उपतहसील विभागात ५२.०९ हजार हेक्टर प्रदेशात मूग, २०.७२ हजार हेक्टरमध्ये शेंगा, ३६.२५ हजार हेक्टर क्षेत्रात सूर्यफुल, १.१७ लाख हेक्टरमध्ये मका, ९८.२८ हजार हेक्टर प्रदेशात सोयाबीन आणि इतर कडधान्यांचे उत्पादन घेण्यात आले होते. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ऊस लागवड वगळता कडधान्य, तेलबिया आणि कापसाचे उत्पादन ४,२७,९५८ हेक्टर प्रदेशात घेतले जाणार असल्याचा अंदाज कृषी खात्याने वर्तविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com