बेळगाव : उरलीसुरली पिकेही गेली

शहर परिसरातील शेतकऱ्यांची व्यथा; संततधार पावसाचा फटका
belgoan heavy rain farmer crop damage
belgoan heavy rain farmer crop damagesakal

बेळगाव : गेल्या महिन्याभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहर परिसरातील कोथिंबीर, मिरची, कलिंगड, काकडी, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी पिकांना मोठा फटका बसला होता. आता गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे उरलीसुरली पिकेही हातातून गेली आहेत. त्यामुळे, यंदाचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांना नुकसानीचा ठरल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने पिकांची पाहणी करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले होते. तसेच शेतातील कामे पूर्ण करण्यास विलंब झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले होते. शिवारात पाणी साचून राहिल्याने रब्बी पिकांची पेरणीही लांबली होती. त्यामुळे, कडधान्य व भाजीपाला पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना उशीर झाला होता. त्यामुळे, यंदा कडधान्य व भाजीपाला पिकांची काढणी मेपर्यंत लांबली आहे. मात्र, आता पडत असलेल्या पावसामुळे मिरची, कोथिंबीर, काकडी, कलिंगड, कोबी व इतर पिके खराब झाली आहेत.

गुरुवारी पडलेल्या पावसाचा जोर अधिक होता. तसेच वाऱ्यामुळे कलिंगड व काकडीचा वेल खराब झाला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास शिल्लक पिकेही नष्ट होतील या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरवर्षी अशाच प्रकारे नुकसान सहन करावे लागले तर शेतकरी संपून जाणार आहे. याचा विचार करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

पावसाचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. मिरची व कोथिंबीर पिकात पाणी साचून पिके खराब होण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाने पीक नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे.

- राजू मरवे, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com