नगर : लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांचा माल कवडी मोल दराने व्यापारी खरेदी करत आहेत. हाच माल हे व्यापारी शहरांत चढ्यादराने विकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होत आहे. लॉकडाउन व शेतकऱ्यांची पिळवणूक आणखी काही महिनीने अशीच सुरू राहिल्यास शेतकऱ्यांची मुले व्यापाऱ्यांच्या घरांवर दरोडा घालतील व या दरोड्याचे नेतृत्त्व मी करेल, असे क्रांतिकारी शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक ऍड. सतीश पालवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना निवेदनाद्वारे कळविले आहे.
व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दर मिळत असल्याने एका शेतकऱ्याने उद्वीग्न होऊन नगर-पाथर्डी रस्त्यावर टॉमेटो फेकून दिले. हे पाहून शेतकरी नेते ऍड. सतीश पालवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री शंकरराव गडाख यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून छायाचित्र व निवेदन पाठवून तीव्र नाराजी व्यक्त केली.
देशात लॉकडाउन जाहीर केल्याने शेतकरी त्यांचा माल शहरात येऊन विक्री करू शकत नाहीत. त्यामुळे व्यापारी हा माल अतिशय कमी किमतीत घेत आहेत. व हाच माल व्यापारी शहरातील ग्राहकांना लॉकडाउनची कारणे सांगत महागात विकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी माल पिकविण्यासाठी केलेला खर्चही त्यांना मिळत नसल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर माल फेकून द्यावा लागत आहे. हीच स्थिती आणखी काही महिने राहिल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येईल. या आर्थिक संकटामुळे शेतकऱ्यांची मुले व्यापाऱ्यांच्या घरांवर दरोडा घालतील व या दरोड्याचे नेतृत्त्व मी स्वतः करेल असे ऍड. पालवे यांनी निवेदनातून सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.