पतसंस्थांविरुद्धच्या तक्रारी तथ्यहीन ; शासकीय अधिकारी हैराण 

पतसंस्थांविरुद्धच्या तक्रारी तथ्यहीन ; शासकीय अधिकारी हैराण 
Updated on

कऱ्हाड ः कर्ज थकले किंवा थकलेल्या कर्जप्रकरणी विरोधात निकाल गेला की, पतसंस्था, बॅंकांना "टार्गेट' करून त्यांच्याविरुद्ध उपनिबंधकांकडे तक्रारी करण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. मात्र, बहुतांश तक्रारींत तथ्य आढळून येताना दिसत नाही. 

शहरासह तालुक्‍यात 150 हून अधिक पतसंस्था आहेत. त्यामधील 12 पतसंस्था अवसायनात आहेत. 15 हून अधिक पतसंस्थांचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या सुरू आहेत. अशी स्थिती असतानाच शहरासह तालुक्‍यातील विविध पतसंस्थांसह सहकारी संस्था व बॅंकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी होत आहेत. वर्षभरात वेगवेगळ्या संघटना, सामान्य नागरिकांनी तालुक्‍यातील विविध पतसंस्था विरोधात किमान 350 तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे त्याचा निपटाराही होऊ शकलेला नाही. अर्थात त्यातील अनेक तक्रारी केवळ विरोध म्हणून केल्याचे शासकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. काही पतसंस्थांविरोधात आंदोलनेही झाली आहेत. त्यांचाही प्रश्न अद्याप शासकीय पातळीवर मार्गी लागू शकलेला नाही. मात्र, दाखल झालेल्या तक्रारींपैकी किमान 90 टक्के तक्रारी या केवळ रागातून झाल्याचे उपनिबंधक कार्यालयाच्या तपासणीत पुढे आले आहे. एखाद्या व्यक्ती विरोधात संस्थेने कोणतीही जप्तीची कारवाई केली की, त्या संस्थेच्या विरोधात तक्रारी देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या संस्थेने त्या कारवाईबाबत त्यापूर्वीच सर्व कागदपत्रे दाखल केलेली असतात. त्यामुळे त्या तक्रारीला "आफ्टर थॉट' तक्रार समजून ती निकालात काढली जाते. अशा सुमारे 250 तक्रारी निकाली काढल्या असल्या तरी तेवढ्याच तक्रारी पुन्हा वाढत असल्याचे वास्तवही आहे. आलेल्या तक्रारींचा योग्य निपटारा करताना उपनिबंधक कार्यालयाची दमछाक होताना दिसते. शहरासह तालुक्‍यातील विविध पतसंस्थांवर विविध संघटना, व्यक्तींतर्फे दाखल झालेल्या तक्रारींची संख्या 350 वर पोचली आहे. त्यात संस्थांच्या कर्ज प्रकरणांबाबत जास्तीत जास्त तक्रारी झाल्या आहेत. किमान 250 तक्रारी बोगस कर्ज वितरणावर आहेत. 50 तक्रारी मुदतठेव संपूनही संस्थेतून पैसे मिळत नाहीत, अशा आहेत. 25 वर तक्रारी संचालकांच्या विरोधात आहेत. त्या सगळ्या अर्जांची चौकशी होणार की नाही, हा भाग मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. ज्या संस्थांच्या कर्जवितरणाच्या तक्रारी आहेत, त्यात बहुतांशी तक्रारी या खोट्या स्वाक्षऱ्या करून कर्ज घेतल्याबद्दलच्या आहेत. त्याबाबत सखोल चौकशी झाल्याशिवाय काहीही माहिती सांगता येणार नाही, असे उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले. 

ठेवी अडकल्या 

विविध पतसंस्थांबाबत वेगवेगळी चर्चा आहे. शहरात यापूर्वी भुदरगड, शांतीसागर या बाहेरून आलेल्या पतसंस्थांनी व्यापाऱ्यांसह सामान्यांच्या कोट्यवधींच्या ठेवी बुडविल्या आहेत. त्याचा अनुभव असतानाही शहरातील लोक अजूनही पतसंस्थांकडे जादा व्याजामुळे आकर्षित होताना दिसतात. शहरासह तालुक्‍यातील सुमारे 12 पतसंस्था सध्या अवसायनात आहेत. त्यांच्यावर उपनिबंधकांचे नियंत्रण आहे. त्या संस्थांत सामान्यांच्या कोट्यवधींच्या ठेवी अडकल्या आहेत. त्या परत मिळाव्यात यासाठी लोक पतसंस्थांत हेलपाटे मारत आहेत. त्या ठेवीदारांच्या पैशाबाबत योग्य तो निर्णय होण्याची गरज आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com