
कणबर्गी (बेळगाव) - कणबर्गी शेतवडीत शेतकऱ्यांनी कोथिंबीर, काकडी, कोबीज, चनी, वाटाणा, हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले आहे. सध्या या पिकांची काढणी सुरू आहे. मात्र, रात्रीच्या वेळी समाजकंटकांकडून पिकाची चोरी होत असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी दिसून येत आहे.
कणबर्गी भागात मोठ्या प्रमाणात रब्बी पिके घेतली जातात. दरवर्षी पिकांची समाजकंटकांकडून नासधूस करत चोरी केली जाते. काही शेतकऱ्यांनी अनेकांना रंगेहात पकडले व जाब विचारला मात्र, त्यांच्याकडून अरेरावीची भाषा केली जात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यावेळी शेतकरीवर्गात भितीचे वातावरण निर्माण झाली आहे. तीन महिन्यांपर्यंत पिकांचे रक्षण करूनही समाजकंटकांकडून त्या पिकाची चोरी होत असल्याने अनेकांतून संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना इतका त्रास होत नव्हता. मात्र,आता त्रास वाढला आहे. रात्रीच्या वेळी चोरी होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
रात्रीच्या वेळी कणबर्गी शिवारात अनेक जण मद्यपान करत बसतात. त्यांच्याकडून काचेच्या बॉटल व प्लास्टिक तिथेच टाकले जाते. याचा त्रासही शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. अनेक मद्यपी शिवारात शेकोटी करून बसतात आणि येथून निघून जाताना गवत गंजींना आग लावण्याचे प्रकार केले जातात. यामुळे अशा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीत अनेक पिके घेतली आहेत, यात काकडी, कोबी, चणा, वाटाणा, हरभरा यांचा समावेश आहे. मात्र, समाजकंटकांकडून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान व चोरी केली जात आहे.
- अप्पया गोवेकर, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.